🌅🌅 १२ ऑगस्ट – घटना 🌅दिनविशेष 🌍🌅 #DinVishesh स्मृतिदिन

 

 🌅🌅 १२ ऑगस्ट – घटना 🌅दिनविशेष 🌍🌅 #DinVishesh स्मृतिदिन

***********

१२ ऑगस्ट

निर्माता गुलशन कुमार स्मृतिदिन

************

 

जन्म - ५ मे १९५१

स्मृती - १२ ऑगस्ट १९९७

 

लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला. ते २३ वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.

 

गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रिज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते. गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला. देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते.

 

७० च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले. ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले. बॉलिवूड मध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.

 

फिल्म इंडस्ट्री मध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्यांच्या कमाईचा एक हिस्सा सामाजिक कामासाठी देण्यास सुरुवात केली. वैष्णोदेवीचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भंडारा सुरु केला होता. आजही तो भंडारा अविरत सुरु आहे. या भंडाऱ्याच्या माध्यमातून भक्तांना मोफत भोजन दिले जाते. गुलशन कुमार यांनी वैष्णोदेवीची अनेक गाणी गायली आहेत.

 

गुलशन कुमार यांचे १२ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.

 

गुलशन कुमार यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१२ ऑगस्ट

अभिनेता दीपक शिर्के यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १९५७

 

अभिनेता दीपक शिर्के यांचा आज वाढदिवस.

 

धुमधडाका, थरथराट, झपाटलेला यासारख्या मराठीतील दमदार चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्या सोबत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे दीपक शिर्के होय. खरे तर 'तिरंगा' आणि 'अग्निपथ' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना 'गेंडास्वामी, अण्णा शेट्टी' याच नावाने ओळखले जाते.

 

दीपक शिर्के यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दी मध्ये शिर्के यांनी शंभरहून अधिक हिंदी चित्रपट तसेच तितकेच मराठी चित्रपट केले आहेत. अभिनयाचा डिप्लोमा घेतल्यानंतर गोविंद निहलानींच्या आक्रोशमध्ये शिर्केंना चांगली संधी मिळाली.

 

दूरदर्शन वरील 'एक शून्य शून्य' मधील त्यांची भूमिकाही रसिकांच्या तितकीच स्मरणात राहिली आहे. सोनी वाहिनीवरील सी.आय.डी. या मालिकेत देखील ते झळकले. याच वेळी ते टुरटूर, माझे काय चुकले, उडून जा पाखरा; या नाटका मध्ये ते चमकले.

 

अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या अग्निपथचित्रपटा मधील खलनायकी भूमिकेमुळे शिर्केंच्या कारकीर्दीला गती मिळाली. एक गाडी बाकी अनाडी, घनचक्कर, धडाकेबाज, अफलातून, शेम टू शेम, अबोली, रात्र आरंभ, मराठा बटालियन, व्हेंटिलेटर; हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट.

 

तिरंगा, वंश, जुडवा, खुदा गवाह, जय किशन, जीत, काला साम्राज्य, इश्क, भाई, टारझन द वंडर कार; हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट.

 

दीपक शिर्के यांच्या पत्नीचे नाव गार्गी शिर्के. गार्गी या दापोली येथे अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१२ ऑगस्ट

अभिनेत्री सयेशा सहगल चा वाढदिवस

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १९९७ (मुंबई)

 

सयेशा सहगल ही चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहे. तिने तमिळ चित्रपटांतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नंतर तेलुगु चित्रपट 'अखिल' या चित्रपटात काम केले. यासह तिने बर्‍याच सिनेमा मध्ये काम केले आहे.

 

सयेशा बद्दल काही मजेदार तथ्य :

 

अगदी लहान वयातच सयेशाचे लग्न झाले. तिचे लग्न झाल्यावर ती केवळ २१ वर्षांची होती.

 

सयेशा एक नायिका आहे जिने अगदी लहान वयातच प्रगती केली आहे.

 

सयेशा ही एकमेव नायिका आहे जिने केवळ १८ वर्षांत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

 

सयेशा कोणत्याही पदार्थांचे सेवन करत नाही, जसे की धूम्रपान, मद्यपान इ.

 

सयेशाने शिवायया बॉलिवूड चित्रपटातूनही डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने अजय देवगण सोबत अभिनय केला.

 

सयेशा ही एकमेव नायिका आहे जी लॅटिन अमेरिकन, रूंबा, सांबा, जाझ फंक, बेली-नाच, हिप-हॉप, कथक आणि ओडिसी अशा विविध मार्गांनी नाचवते.

 

सयेशाचे इतरही बरेच गुण आहेत, जसे तिला गाणे देखील माहित आहे. तिला वयाच्या ५ व्या वर्षी गाण्याचे प्रशिक्षण दिले.

 

सयेशा अभ्यासातही चांगली होती, ती एक वेगवान स्त्री होती आणि नेहमीच ८५-९०% गुण मिळवते.

 

सयेशा ही एकमेव नायिका आहे जिने १२ हून अधिक चित्रपटांत पदार्पण केले आहे, ते देखील अगदी अगदी लहान वयात.

 

सयेशा ही ९० च्या दशकाची बॉलिवूड अभिनेता सुमित सहगलची चि मुलगी आहे.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१२ ऑगस्ट

अभिनेत्री सारा अली खान चा वाढदिवस

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १९९५ (मुंबई)

 

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा आज वाढदिवस.

 

सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी आहे. शर्मिला टागोर यांची नात आहे. सारा अली खान जेव्हा नऊ वर्षाची होती तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर सारा अली खान आपली आई अमृता सिंग कडे राहिली. सुरुवातीला सैफ अली खानला, सारा अली खानला व इब्राहिम अली खानला भेटण्याची परवानगी नव्हती.

 

२०१६ मध्ये न्यूयॉर्कनमधील कोलंबिया विद्यापीठात इतिहास आणि राज्यशास्त्र ची पदवी प्राप्त करुन सारा अली खान भारतात आली व तिने बॉलिवूड मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

 

सारा अली खानने २०१८ साली अभिषेक कपूरच्या केदारनाथया रोमँटिक  चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. सारा अली खानने ह्या पिक्चर मध्ये एका हिंदू मुलीची भूमिका केली जी एका मुस्लिम मुलाच्या प्रेमा मध्ये पडते. त्यानंतर तिने सिंबाहा पिक्चर केला त्याच्यामध्ये ती एका पोलीसवाल्याच्या प्रेमात पडते, तिच्या ऑपॉजिट रणविर सिंगहोता. ही २०१८ ची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. याच पिक्चरचा भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट स्त्री पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार पण मिळाला आहे.

 

लवकरच सारा अली खान वरूण धवन सोबत कुली नं.१च्या रिमेक मध्ये दिसणार आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१२ ऑगस्ट

जागतिक युवा दिन

************

 

आज जागतिक युवा दिन !

 

जागतिक स्तरावर १२ ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिनम्हणून साजरा केला जातो.

 

दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा यामागचा विचार आहे.

 

आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा आहे. मानवी मुल्ये आणि मानवी विकासा बाबत त्याला चांगली जाण आहे.

 

विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. या क्षमतेचा उपयोग तो जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे करू शकतो.

 

जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

************

१२ ऑगस्ट

जागतिक हत्ती दिन

************

 

आज जागतिक हत्ती दिन ! त्या निमित्ताने जाणून घेऊया हत्ती ह्या प्राण्याबद्दल माहिती !

 

हत्ती हा एक विशालकाय देहाचा शाकाहारी सस्तन प्राणी आहे.

 

भारतात उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात.

 

हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटर पर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती ओळखला जातो.

 

भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नराला देखील सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला माखनाम्हणतात. आफ्रिकेत सापडणाऱ्या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात. भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते. हत्तीचे शरीर अवाढव्य असते. त्याचे वजन पाच ते सहा टन असते. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.

 

इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतात. याकरता हत्तीचे छोटे बछडे पकडून त्यांना लहानपणापासूनच शिक्षण द्यावे लागते.

 

जंगलात लाकडे कापायच्या गिरणीत मोठमोठी झाडे कापून लाकडाचे ओंडके बनवतात. शिकवलेले हत्ती हे ओंडके सोंडेत धरून किंवा पायाने ढकलत ढकलत वाहून नेतात. वाहून आणलेले ओंडके ते नदीच्या पाण्यात टाकतात. मग ते ओंडके पाण्याबरोबर नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर किंवा प्रवाहाबरोबर खाली वाहत जातात.

 

शिकवलेले हत्ती गाड्या ओढतात. पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठीसुद्धा होत असे. हत्तींवर बसून लढाया करत. हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधून त्यात बसून राजे-महाराजे आणि श्रीमंत लोक प्रवास करत. तसंच अंबारीतून मिरवणुका काढत.

 

हत्तींना शिकवून सर्कशीत त्यांच्याकडून कामे करवून घेतात. ते सर्कसमध्ये अनेक प्रकारची कामे करतात. हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात. त्यांना हस्तिदंतम्हणतात. हस्तिदंताना खूप मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिने ठेवण्याच्या पेटया, शोभेच्या वस्तू, पेपरवेट, फुलदाण्या, बांगडया, बटने इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून तयार करतात.

 

हत्ती जंगलात कळपाने राहतात. एकेका कळपात सात-आठपासून २०-२५ पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्याने दोन-तीन मोठ्या माद्या आणि बच्चे असतात. नर कळपात नसतात. कळपात जसे मध्यम वयाचे बच्चे असतात, तसे अगदी लहान बछडेदेखील असतात. कळपाचे नेतृत्व म्हाताऱ्या अनुभवी मादीकडे असते. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो. केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात.

 

वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघेही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना मदमस्तकिंवा मस्त हत्तीअसे म्हणतात. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो.

 

हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात. माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात. माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

१२ ऑगस्ट

गणितज्ञ एस.आर. रंगनाथन जन्मदिन

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १८९२ (तामिळनाडू)

स्मृती - २७ सप्टेंबर १९७२ (बेंगळूरू)

 

शियाळि रामामृत रंगनाथन् हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होत. भारतीयांमध्ये वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन् यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

 

डॉ.रंगनाथन् यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात १२ ऑगस्ट १८९२ साली झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्‌मयाचे अध्ययन सुरु केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्‍चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त‍ केली.

 

शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापनशास्त्राची एल. टी.परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले.

 

ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना स्कूल ऑफ लायब्ररीयनशिपसाठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३० जानेवारी १९२८ रोजी त्यांनी 'मद्रास ग्रंथालय संघाची' स्थापना केली. नंतर ग्रंथालयांची झपाट्याने प्रगती झाली.

 

सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याची महत्त्व डॉ. रंगनाथन् यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्याना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जनतेला करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन् यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला.

 

आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन् ह्यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन् ह्यांनीच रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. रंगनाथन् ह्यांनी मांडलेले पाच पुस्तकालयविज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालयविज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ. रंगनाथन् ह्यांचा वाढदिवस भारतात 'ग्रंथपाल दिनम्हणून साजरा केला जातो.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

१२ ऑगस्ट

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जन्मदिन

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १८९७ (अहमदनगर)

स्मृती - २७ एप्रिल १९८० (लोणी)

 

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म १२ ऑगस्ट १८९७ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता.श्रीरामपूर) या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला.

 

लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथी पर्यंत शिक्षण. नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली. त्याकाळी शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते, हे नेमके हेरून त्यांनी व्यवहार बुद्धी, चातुर्य व काटकसरीने शेती केली.

 

१९२३ मध्ये लोणी बुद्रुक सहकारी पतपेढीची स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट वडार मंडळींना एकत्र आणून मजूर सहकारी सोसायटीची स्थापना केली. इंग्रज सरकारने मुंबई कौन्सिल मध्ये तुकडे बंदी आणि तुकडे जोडहे विधेयक आणले, या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे सावकाऱ्यांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महाराजांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे−पाटील नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह गेले व तेथे हजारो शेतकऱ्यापुढे भाषण देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातूनच त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला.

 

पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकऱ्यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या कौन्सिल हॉलला वेढा घातला, त्यात विखे-पाटील आघाडीवर होते. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेची जाणीव करून देऊन, संघटित होण्याचे व त्यातून व्यक्तिगत व सामुदायिक विकास साधण्याचे महत्त्व पटवून दिले.

 

विखे-पाटील यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड (श्रीरामपूर) येथे १९४५ मध्ये पार पडलेल्या द डेक्कन कॅनॉल्स बागायतदार परिषदेत विखे-पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला. या परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणूक विखे-पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली. त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी १९४५ ते १९५० या कालखंडात अतोनात कष्ट घेऊन, गावोगावी व दारोदारी भटकंती करून भागभांडवल जमविले, तसेच कारखान्याला शासनाकडून मंजूरी मिळविली.

 

कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतीकरिता शेतकऱ्यांचा एकही पैसा खर्च केला नाही. परान्न घेणार नाहीअशी त्यांची प्रतिज्ञा होती, त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगीत असत. विखे-पाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना त्यावेळी हास्यास्पद ठरविली गेली. अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थीतीला तोंड देत विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या प्रवरा सहकारी कारखान्याची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले. त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. प्रवरानगराचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो.

 

पहिली अकरा वर्षे विखे-पाटील यांच्या आग्रहामुळेच डॉ. धनंजयराव गाडगीळ कारखान्याचे अध्यक्ष झाले. तर ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पहात असत. पुढे ते विखे−पाटील प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष (१९६०) व संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष (१९६६) झाले.

 

शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांची योजना विखे-पाटील यांनी यशस्वी रीत्या राबविल्यामुळे भारत सरकारने त्याचा लाभ आणि माहिती भारतातील विविध प्रतिनिधी आणि अभ्यासू शेतकरी यांना व्हावी, म्हणून अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद १९५६ साली प्रवरानगर येथे भरविली. प्रवरानगरचा सहकारी साखर कारखाना व विखे-पाटील हे भारतातील सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान बनले. अशा प्रकारचे आणखी कारखाने उभे राहण्यासाठी विखे-पाटील यांनी अनेक शेतकरी नेत्यांनी प्रोत्साहन दिले. उदा. सांगलीचे वसंतदादा पाटील, वारणानगरचे तात्यासाहेब कोरे, पोहेगावचे गणपतराव ओंताडे, राहुरीचे वाबूराब तनपुरे, अकलूजचे शंकरराव मोहिते, पंचगंगेचे रत्नाप्पा कुंभार, परभणीचे शिवाजीराव देशमुख, इत्यादी.

 

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः प्रवरानगरला येऊन विखे-पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली (१५ मे १९६१). विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांना बचतीचे महत्त्वही पटवून दिले. शासनाची अल्पबचत योजना यशस्वी रीत्या राबविल्याबद्दल १९६५ मद्ये भारताचे तत्कालीन अर्थमंत्री टी.टी. कृष्णम्माचारी यांनी खास मानपत्र देऊन गौरविले. त्याचप्रमाणे कुटुंबनियोजनाची योजनाही १९५९ पासून त्यांनी परिसरात राबविली. या योजनेचे फलित म्हणजे, १९७६ साली ऑक्टोंबर महिन्यात प्रवरा हॉस्पिटल मध्ये चार दिवस भरविलेल्या कुटुंबनियोजन शिबिरात ६२३१ शस्त्रक्रिया यशस्वी रीत्या पूर्ण करण्यात आल्या व त्यातून शस्त्रक्रियांचा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला.

 

विखे-पाटील यांनी पुढील सामाजिक, शैक्षणिक संस्थांवर विविध नात्यांनी काम केले. प्रवरा शिक्षणोत्तेजक सहकारी पतपेढीचे संस्थापक व अध्यक्ष (१९५३), अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष (१९५३-५६), कोपरगाव व कारेगाव सह. साखर कारख्यान्यांचे सन्मानीय संचालक (१९५४), प्रवरा ग्रामीण शिक्षणसंस्थेचे आद्य प्रवर्तक (१९६४), साखर कामगार हॉस्पिटलचे (श्रीरामपूर) अध्यक्ष (१९६८), अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक (१९५८) व अध्यक्ष (१९६८), गोदावरी विकास मंडळाचे सदस्य (१९७१) इत्यादी.

 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने ते प्रभावित झाले व त्यांनी कर्मवीरांना नगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारण्यास पाचारण केले. तसेच सर्वतोपरीने साहाय्य केले. विखे-पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष (१९७८) होते. ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना (१९७४) करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले. त्यांच्या पश्चात् त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या माध्यमांतून अनेक शिक्षणसंस्था- उदा. वैद्यकीय, दंत, परिचालिका, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन (मुलांचे व मुलींचे), औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कला अकादमी तसेच गावोगावी अनेक माध्यमिक विद्यालये इ. संस्था उभ्या राहिल्या. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे-पाटील व नातू राधाकृष्ण विखे-पाटील यांनी समर्थपणे पुढे चालविले आहे.

 

विखे-पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना १९६१ मध्ये पद्मश्रीहा किताब दिला, तर पुणे विद्यापीठाने डी. लिट्’ (१९७८) व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स’ (१९७९) या पदव्या प्रदान केल्या. 

 

विठ्ठलराव विखे पाटील यांचे २७ एप्रिल १९८० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/मराठी विश्वकोश

 

************

************

१२ ऑगस्ट

शास्त्रज्ञ विक्रम साराभाई जन्मदिन

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १९१९ (अमदाबाद)

स्मृती - ३० डिसेंबर १९७१ (कोवालम)

 

विक्रम अंबालाल साराभाई हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

 

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात १२ ऑगस्ट १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्यांना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.

 

आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोर मधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

 

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्सवर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.

 

विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

 

विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली.

 

भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.

 

३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

१२ ऑगस्ट

निर्माता गुलशन कुमार स्मृतिदिन

************

 

जन्म - ५ मे १९५१

स्मृती - १२ ऑगस्ट १९९७

 

लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला. ते २३ वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.

 

गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रिज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते. गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला. देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते.

 

७० च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले. ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले. बॉलिवूड मध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.

 

फिल्म इंडस्ट्री मध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्यांच्या कमाईचा एक हिस्सा सामाजिक कामासाठी देण्यास सुरुवात केली. वैष्णोदेवीचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भंडारा सुरु केला होता. आजही तो भंडारा अविरत सुरु आहे. या भंडाऱ्याच्या माध्यमातून भक्तांना मोफत भोजन दिले जाते. गुलशन कुमार यांनी वैष्णोदेवीची अनेक गाणी गायली आहेत.

 

गुलशन कुमार यांचे १२ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.

 

गुलशन कुमार यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१२ ऑगस्ट

रेल्वे संशोधक जॉर्ज स्टीफेंसन स्मृतिदिन

************

 

जन्म - ९ जुन १७८१ (UK)

स्मृती - १२ ऑगस्ट १८४८

 

जॉर्ज स्टीफेंसन के माता पिता माबेल और रॉबर्ट निरक्षर थे। पिता कोयले की खदान में मजदूरी कर परिवार का भरण पोषण करते थे। उनके पास इतने पैसे नहीं थे कि वे अपने बच्चे को स्कूल भेज सकें। बच्चों को स्कूल जाते देख जॉर्ज जब मां से स्कूल भेजने की जिद करते और रोते तो माबेल किसी तरह उन्हें समझा देतीं कि स्कूल उनके नसीब में नहीं है।

 

समय के साथ जॉर्ज अपने माता पिता की विवशता तो समझ गए, लेकिन पढ़ने की प्रबल इच्छा उनके मन में कहीं न कहीं बढ़ती ही रही। इस बालक में माता पिता के प्रति असीम श्रद्धा थी। यही कारण था कि वह कुछ कमा कर माता पिता की मदद करना चाहते थे।

 

बस इसी चाहत ने पिता की तरह उन्हें भी कोयले की खदान में मजदूर बना दिया । बतौर मजदूर, जॉर्ज की जो भी कमाई होती, उसे अपने माता पिता को देने में उन्हें असीम सुख मिलता। लेकिन बचपन में पढ़ने की जिस भावना ने जन्म लिया था, वह आज भी हरी-भरी थी।

 

जॉर्ज 18 वर्ष के हो चुके थे। एक वर्ष तक मजदूरी करके जब उन्होंने थोड़ा धन अर्जित कर लिया तो मन में बरसों से दबी पढ़ाई की इच्छा फिर हावी हो गई। बचपन की इस लालसा को पूरा करने के लिए उन्होंने रात्रि पाठशाला में एडमिशन ले लिया। रोज मजदूरी खत्म करने के बाद वह नाइट स्कूल में जाते।

 

देखते देखते गणित में उनकी गहरी रुचि पैदा हो गई, जिसके बल पर वह बिना थियरी पढ़े न केवल सिविल व मैकेनिकल इंजीनियर कहलाए बल्कि अपने समय के डैवी जैसे वैज्ञानिकों को मात देकर खदान मजदूरों के लिए सेफ्टी लैंप बनाया।

 

आगे चलकर हेटन क्वेलरी से संडरलैंड तक आठ मील की पहली रेल लाइन बिछाई। 1814 में ब्लूचर नामक इंजन विकसित किया और रेल पटरियों को इंजन से जोड़कर आधुनिक रेल के जनक कहलाए और औद्योगिक क्रांति को ठोस आधार प्रदान किया।

 

संकलक - दिपक तरवडे

 

https:/m.facebook.com/vidnyandinvishesh

 

************

************

१२ ऑगस्ट

अभिनेता दीपक शिर्के यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १९५७

 

अभिनेता दीपक शिर्के यांचा आज वाढदिवस.

 

धुमधडाका, थरथराट, झपाटलेला यासारख्या मराठीतील दमदार चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्या सोबत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे दीपक शिर्के होय. खरे तर 'तिरंगा' आणि 'अग्निपथ' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना 'गेंडास्वामी, अण्णा शेट्टी' याच नावाने ओळखले जाते.

 

दीपक शिर्के यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दी मध्ये शिर्के यांनी शंभरहून अधिक हिंदी चित्रपट तसेच तितकेच मराठी चित्रपट केले आहेत. अभिनयाचा डिप्लोमा घेतल्यानंतर गोविंद निहलानींच्या आक्रोशमध्ये शिर्केंना चांगली संधी मिळाली.

 

दूरदर्शन वरील 'एक शून्य शून्य' मधील त्यांची भूमिकाही रसिकांच्या तितकीच स्मरणात राहिली आहे. सोनी वाहिनीवरील सी.आय.डी. या मालिकेत देखील ते झळकले. याच वेळी ते टुरटूर, माझे काय चुकले, उडून जा पाखरा; या नाटका मध्ये ते चमकले.

 

अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या अग्निपथचित्रपटा मधील खलनायकी भूमिकेमुळे शिर्केंच्या कारकीर्दीला गती मिळाली. एक गाडी बाकी अनाडी, घनचक्कर, धडाकेबाज, अफलातून, शेम टू शेम, अबोली, रात्र आरंभ, मराठा बटालियन, व्हेंटिलेटर; हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट.

 

तिरंगा, वंश, जुडवा, खुदा गवाह, जय किशन, जीत, काला साम्राज्य, इश्क, भाई, टारझन द वंडर कार; हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट.

 

दीपक शिर्के यांच्या पत्नीचे नाव गार्गी शिर्के. गार्गी या दापोली येथे अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१२ ऑगस्ट

बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १९५९ (मुंबई)

 

'ग्रँडमास्टर' किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचा आज वाढदिवस.

 

त्यांनी ग्रँडमास्टर हा किताब १९८४ साली मिळवला. प्रवीण ठिपसे यांचे वडील डॉ. महादेव ठिपसे हे महात्मा गांधींचे अंगरक्षक होते. स्वातंत्र्यलढ्यासाठी १० वर्षे दिल्यानंतर ते डॉक्टर झाले आणि त्यांनी मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली. प्रवीण यांच्या आईनी आपल्या सर्व मुलांना बुद्धिबळाचं वेड लावलं. तेही इतकं की, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ही मुलं खेळायचा आग्रह करत. मोठे बंधू अभय यांना खेळाचं तांत्रिक ज्ञान अवगत होतं आणि शिकवण्याचं कौशल्यही. बुद्धिबळाचे क्लिष्ट धडे ते अत्यंत सोप्या शब्दात धाकट्या दोघा भावांना देत. त्यांची ही हातोटी बघून पुढे अनेक वर्षांनी महाराष्ट्र शासनाने त्यांना बुद्धिबळ प्रशिक्षणासाठीचा मानाचा दादोजी कोंडदेव पुरस्कारदेऊन गौरवले होते.

 

आईकडून प्राथमिक धडे घेतल्यावर प्रवीण ठिपसे यांनी सहा-सातव्या वर्षीच वेगवेगळ्या शालेय स्पर्धा खेळायला सुरुवात केली. आईची एक आठवण सांगताना म्हणतात, ‘‘१९७० मध्ये मी आठवी-नववीत असताना आमच्या शाळेने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्याविषयी अनास्था दाखवल्याने आईने शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती दादरच्या बालमोहन शाळेत जाऊन दादासाहेब रेगे यांना जाऊन भेटली. परिणामी १९७२-७३ आणि १९७३-७४ या दोन्ही वर्षी बुद्धिबळाचा आंतरशालेय करंडक बालमोहनकडे आला आणि त्यानंतरही पुढची तीन वर्षे प्रवीण ठिपसे यांचा धाकटा भाऊ सतीश यांनी तो शाळेकडेच राखला.

 

आंतरशालेय करंडक जिंकल्यामुळे रामचंद्र सप्रे, श्रीकृष्ण साखळकर, अरुण वैद्य, सुरेश शाळिग्राम, अविनाश आपटे अशा महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचं लक्ष प्रवीण ठिपसे यांनी वेधून घेतलं. त्यानंतर या दिग्गजांचा खेळ बघत, त्यांच्या चर्चा ऐकत या एकलव्याची साधना सुरू झाली आणि त्याने एक-दोन वर्षांतच प्रथम राज्य व नंतर राष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरुवात केली.

 

संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेणारी १९७४ मधली एक घटना प्रवीण ठिपसे यांच्या जीवनात घडली. बुद्धिबळावर ज्यांनी १०० च्यावर पुस्तकं लिहिली आहेत, असे रशियाचे प्रसिद्ध खेळाडू युरी अवेरबाख भारतात आले असताना, ते एकाच वेळी २५ अव्वल खेळाडूंशी खेळतील असं जाहीर करण्यात आलं. त्यांपैकी २४ खेळाडूंना त्यांनी हरवलं. त्यांची एकच मॅच बरोबरीत सुटली. तो प्रतिस्पर्धी होता प्रवीण ठिपसे, वय वर्ष १५. हा खेळ बघणाऱ्या डॉ. सव्‍‌र्हेयर या महान खेळाडूने त्याच वेळी भविष्य वर्तवलं की, एक ना एक दिवस हा मुलगा ग्रॅण्डमास्टर होईल. त्यांचे हे बोल १९९७ साली खरे ठरले.

 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच बुद्धिबळ ऑलम्पियाड, एशियन टीम चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा प्रवीण ठिपसे यांचा सिलसिला सुरू होता. बुद्धिबळातील पराक्रमामुळे १९ व्या वर्षी छत्रपती पुरस्कार, २३व्या वर्षी अर्जुन पुरस्कार आणि पंचविशीच्या आतच ग्रॅण्डमास्टर किताबासाठी पहिला परफॉर्मन्स असा त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला.

 

प्रवीण ठिपसे यांची पत्नी भाग्यश्री साठे ठिपसे या महिला इंटरनॅशनल मास्टर आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१२ ऑगस्ट

अभिनेत्री सारा अली खान चा वाढदिवस

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १९९५ (मुंबई)

 

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा आज वाढदिवस.

 

सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी आहे. शर्मिला टागोर यांची नात आहे. सारा अली खान जेव्हा नऊ वर्षाची होती तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर सारा अली खान आपली आई अमृता सिंग कडे राहिली. सुरुवातीला सैफ अली खानला, सारा अली खानला व इब्राहिम अली खानला भेटण्याची परवानगी नव्हती.

 

२०१६ मध्ये न्यूयॉर्कनमधील कोलंबिया विद्यापीठात इतिहास आणि राज्यशास्त्र ची पदवी प्राप्त करुन सारा अली खान भारतात आली व तिने बॉलिवूड मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

 

सारा अली खानने २०१८ साली अभिषेक कपूरच्या केदारनाथया रोमँटिक  चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. सारा अली खानने ह्या पिक्चर मध्ये एका हिंदू मुलीची भूमिका केली जी एका मुस्लिम मुलाच्या प्रेमा मध्ये पडते. त्यानंतर तिने सिंबाहा पिक्चर केला त्याच्यामध्ये ती एका पोलीसवाल्याच्या प्रेमात पडते, तिच्या ऑपॉजिट रणविर सिंगहोता. ही २०१८ ची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. याच पिक्चरचा भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट स्त्री पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार पण मिळाला आहे.

 

लवकरच सारा अली खान वरूण धवन सोबत कुली नं.१च्या रिमेक मध्ये दिसणार आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१२ ऑगस्ट

अभिनेत्री सयेशा सहगल चा वाढदिवस

************

 

जन्म - १२ ऑगस्ट १९९७ (मुंबई)

 

सयेशा सहगल ही चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहे. तिने तमिळ चित्रपटांतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नंतर तेलुगु चित्रपट 'अखिल' या चित्रपटात काम केले. यासह तिने बर्‍याच सिनेमा मध्ये काम केले आहे.

 

सयेशा बद्दल काही मजेदार तथ्य :

 

अगदी लहान वयातच सयेशाचे लग्न झाले. तिचे लग्न झाल्यावर ती केवळ २१ वर्षांची होती.

 

सयेशा एक नायिका आहे जिने अगदी लहान वयातच प्रगती केली आहे.

 

सयेशा ही एकमेव नायिका आहे जिने केवळ १८ वर्षांत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

 

सयेशा कोणत्याही पदार्थांचे सेवन करत नाही, जसे की धूम्रपान, मद्यपान इ.

 

सयेशाने शिवायया बॉलिवूड चित्रपटातूनही डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने अजय देवगण सोबत अभिनय केला.

 

सयेशा ही एकमेव नायिका आहे जी लॅटिन अमेरिकन, रूंबा, सांबा, जाझ फंक, बेली-नाच, हिप-हॉप, कथक आणि ओडिसी अशा विविध मार्गांनी नाचवते.

 

सयेशाचे इतरही बरेच गुण आहेत, जसे तिला गाणे देखील माहित आहे. तिला वयाच्या ५ व्या वर्षी गाण्याचे प्रशिक्षण दिले.

 

सयेशा अभ्यासातही चांगली होती, ती एक वेगवान स्त्री होती आणि नेहमीच ८५-९०% गुण मिळवते.

 

सयेशा ही एकमेव नायिका आहे जिने १२ हून अधिक चित्रपटांत पदार्पण केले आहे, ते देखील अगदी अगदी लहान वयात.

 

सयेशा ही ९० च्या दशकाची बॉलिवूड अभिनेता सुमित सहगलची चि मुलगी आहे.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

१२ ऑगस्ट (१९४२) : चले जाव चळवळ पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी

 

घटना

 

१८५१: आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.

१८८३: शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला.

१९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले.

१९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९४२: चले जाव चळवळ पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी.

१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.

१९५०: अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.

१९५२: मॉस्कोमधे १३ ज्यू विद्वानांची हत्या.

१९५३: पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली.

१९६०: नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको १ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.

१९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.

१९७७: श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.

१९८१: आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.

१९८२: परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्‍या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.

१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली.

१९९०: दक्षिण डकोटा मध्ये सु हॅन्ड्रिकसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायरनोसॉरस रेक्स चा हाडांचा सापळा सापडला.

१९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.

१९९८: सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कार जाहीर.

२०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड.

२००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.

२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.

 

जन्म

 

१८०१: ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे १८८९)

१८६०: एडॉल्फ हिटलर यांही आई क्लारा हिटलर  यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९०७)

१८८०: चरित्रकार,वाड्मयविवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म.

१८८१: अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सेसिल डी मिल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५९)

१८८७: नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंगर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६१)

१८९२: भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ एस. आर. रंगनाथन यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२)

१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)

१९१०: सिंगापूरचे पहिले अध्यक्ष यूसुफ बिन इशक यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७०)

१९१९: भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१)

१९२४: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८)

१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००४)

१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७५)

१९२६: गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म.

१९४८: कवी, समीक्षक व अनुवादक फकिरा मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे यांचा जन्म.

१९५९: बुद्धीबळपटू प्रवीण ठिपसे यांचा जन्म.

 

मृत्यू

 

१९६४: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक इयान फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०८)

१९६८: नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन.

१९७३: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९११)

१९८२: अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचे निधन. (जन्म: १६ मे १९०५)

१९८४: कवी, समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन.

२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९३२)

 

     यशवंत - एक प्रेरणास्रोत  

 

 

( सातवे पर्व : भाग - १६१/१७५)

 

💫  बायजू रविंद्रन  💫

 

'फोर्ब्स' ने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली. या यादी मध्ये एकेकाळी ट्युशन्स घेणार्‍या एका शिक्षकांचाही समावेश केला आहे. 'फोर्ब्स' च्या म्हणण्यानुसार त्याची सध्याची संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

 

एका शिक्षकाकडे असलेली इतकी रक्कम वाचून कदाचित आपणांस आश्चर्य वाटत असेल. पण, इतकी संपत्ती मिळविण्या मागे संघर्षही मोठाच आहे. कोण हा शिक्षक? काय आहे त्याचा संघर्ष?

 

जाणून घेऊ या, आजच्या भागात. चला तर मग !

 

केरळ मधील कन्नूर जिल्ह्यातील ​अझिकोड या ठिकाणी एका शिक्षक दांपत्याच्या पोटी १९८० सालच्या दरम्यान त्याचा जन्म झाला. घरच्या शैक्षणिक वातावरणामुळे त्याच्यावर उत्तम संस्कार झाले. त्यामुळेच त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करू लागला.

 

सुट्टी च्या निमित्ताने काही दिवस तो बेंगलोर ला गेला. तेथे त्याचे काही मित्र CAT परीक्षेची तयारी करत होते. त्या मित्रांना त्याने गणित विषयासाठी मार्गदर्शन केले. त्याचे ते सर्वच मित्र त्या परीक्षेत यशस्वी झाले. त्या मित्रांनी त्याला ट्युशन सुरू करण्याविषयी आग्रह धरला. मित्रांच्या आग्रहाचा सकारात्मक विचार केला.

 

नोकरी सोडली आणि आपले संपूर्ण लक्ष ट्युशनवर केंद्रित केले. त्याच्या शिकविण्याच्या पद्धतीने अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. त्याचा क्लास छोट्याशा खोलीतून हॉल मध्ये गेला. हॉल मधून ऑडीटोरियम मध्ये आणि तेथून थेट स्टेडियम मध्ये गेला. एकाच वेळी तब्बल २५००० विद्यार्थ्यांची त्याने ट्युशन घेतली. इतका तो प्रचंड प्रसिद्ध झाला.

 

प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शहरात जाऊन विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करण्याने पैसा, वेळ आणि श्रम तिन्हींचा अपव्यय होऊ लागला. एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. असे साधन निर्माण करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला आणि त्याला एक कल्पना सुचली.

 

त्याने एक ऑनलाईन शिकवणी घेणारी Think and Learn Private Ltd. ही कंपनी सुरू केली. त्याच्या माध्यमातून एक वेबसाईट सुरू केली. त्यावर अनेक व्हिडिओ अपलोड केले. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ लागला. ती साईट ही लोकप्रिय झाली.

 

मग त्याने एक ऍप तयार केले. या ऍप च्या माध्यमातून ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्याना सोप्या भाषेत सर्व विषयांचे शिक्षण, अगदी घरबसल्या मिळू लागले. अल्पावधीतच या ऍप ने पालकांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित केलेच शिवाय अनेक गुंतवणूक दारांचे ही लक्ष आकर्षित केले. आणि त्याला यशाच्या शिखरावर पोहचविले. ते ऍप म्हणजेच BYJU's आणि त्याचा संस्थापक म्हणजेच "बायजू रविंद्रन" होय.

 

BYJU's ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम एडटेक कंपनी आहे. एका खोलीत सुरू झालेल्या ट्युशन चा पसारा साऱ्या जगभर पसरला आहे. यासाठी बायजू रविंद्रन चे कष्ट, कामावरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास या गोष्टी कारणीभूत आहेत.

 

प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील सर्वोत्तम गुणाची जाण असणे फार गरजेचे आहे. एखादी गोष्ट अतिशय सोपी करून सांगणे. हा सर्वोत्तम गुण बायजू यांच्याकडे होता. त्याचा त्यांना शोध लागला. त्यामुळेच ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकले.

 

आज भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंतांच्या यादीत बायजू रविंद्रन यांचा समावेश आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.

 

धन्यवाद !

 

श्री. संदीप पाटील, दुधगाव

9096320023

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

!! 12 ऑगस्ट  दिनविशेष ॥

 

             🔥 गुरवार 🔥

 

🌎🌎 घडामोडी🌎🌎

 

👉 2000 - प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ता मेघा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड

👉 1998 - सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर

👉 1988 - कुसुमाग्रज यांचा अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुबंई येथे सुरु झाली

 

            🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

जन्म

 

👉 1948 - कवी समीक्षक अनुवादक फकीरा मुजांजी तथा फ.मुख्याध्यापक.शिंदे यांचा जन्म

👉 1926 - गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार बी.आर.तथा अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म

 

मृत्यू

 

👉 1984 - कवी,समीक्षक व अनुवादक आनंदी बाई जयवंत

👉 1968 - बाळशास्ञी व्यंकटेश हरदास नामवंत वक्ते आणि विव्दान साहित्यचार्य

 

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏

🌎🌍 दिनविशेष 🌍

No comments:

Post a Comment