╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
|
|
नागपंचमी (श्रावण शुद्ध पंचमी) |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
भारतात नाग-साप यांना देव मानले जाते. काही नाग मानवाला उपकारक तर काही
विषरी नाग-साप अपकारक मानले जातात. कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भितीपोटी ही
कल्पना आली असावी. नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली
आहे.या सणामागची पौराणिक कथाअशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट
सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व काही भस्मसात होई.
श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस
म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी). |
|
तेव्हापासून लोक नागाची पूजा करुन नागाला
लाह्या, दूध वाहतात. नागदेवतेने प्रसन्न होऊन
आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते. या दिवशी नागदेवतेबरोबर
श्रीकृष्णाची सुध्दा पूजा करतात. अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात. पाटावर
चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात.
नवनागांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. |
|
१) अनंत २) वासुकी ३) शेष ४) पद्मनाभ ५)
तक्षक ६) कालीया ७) शंखापाल ८) कंषल ९) धृतराष्ट्र |
|
नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी
तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे
इत्यादी निषिध्द मानले आहे. कारण वरील क्रीया करताना अनावधानाने साप किंवा नाग
यांना इजा पोरण्याची शक्यता असते असे मानले जाते. |
नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रीया हातावर
मेंदी काढतात व नवीन बांगडया भरतात. खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके
घेण्याचा खेळ खेळतात. |
|
या दिवशी गारूडी लोक शहरात नाग घेऊन
रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्याची पूजा करतात. या दिवशी
पुरणाची किंवा साखर-खोब-याची दिंडे बनवतात. |
|
महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा या गावाला
प्रचंड मोठी जत्रा भरते. आसपासच्या खेडयातूनच नव्हे तर परदेशी पाहुणे सुध्दा
तिथे येतात. हजारो गारुडी साप-नाग घेऊन येतात. कितीही विषारी नाग-साप असले तरी
या दिवशी ते कुणाला दंश करीत नाहीत अशी लोकांची श्रध्दा आहे. |
✧══════•❁❀❁•══════✧ |
संकल्पना
/संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
शिक्षक
विचार मंच पुणे.
======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ |
नाग पंचमी कधी आहे |
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ |
|
|
हिंदू दिनदर्शिकेनुसार नाग पंचमीचा सण श्रावण
महिन्याच्या शुक्ल पंचमी तिथीला साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शंकराचे अलंकार असलेल्या साप
देवतेची पूजा केली जाते. या दिवशी नागांची पूजा केल्याने जीवनातील त्रास दूर
होतात. यावेळी नाग पंचमीचा सण शुक्रवार 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. |
|
असे मानले जाते की या दिवशी नागांची पूजा
करून आणि त्यांना दूध पाजून नाग देव प्रसन्न होतात. या व्यतिरिक्त, या दिवशी लोक त्यांच्या घराच्या दारावर
नागांची आकृती देखील काढतात. हिंदू धर्मात सर्व सण आणि त्यांच्याशी संबंधित कथा
वर्णन केल्या आहेत. अशा काही कथा नाग पंचमीशी देखील जोडलेल्या आहेत. चला या
कथांबद्दल जाणून घेऊया .... |
|
महाभारतानुसार, महाभारतातील एक आख्यायिका, कुरु वंशाचा राजा परीक्षितचा मुलगा जनमेजय
याने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अनुष्ठान करण्याचा निर्णय
घेतला. राजा परीक्षितचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यामुळे, जनमेजयाने यज्ञात सापांचा बळी देण्याचा
निर्णय घेतला. वास्तविक, सापांचा राजा
तक्षकाला अडकवणे हा त्याचा उद्देश होता कारण त्याने जनमेजयच्या वडिलांना चावा
घेतला होता. अशाप्रकारे यज्ञाचे नाव सर्प सत्र किंवा सर्प यज्ञ असे ठेवले गेले. |
|
हे यज्ञ खूप शक्तिशाली होते. या यज्ञाच्या
सामर्थ्यामुळे त्यामध्ये चहुबाजूंनी साप ओढले गेले. तथापि, तक्षक साप पाताल लोकमध्ये लपण्यात यशस्वी
झाला. मग जनमेजयाने यज्ञ करणाऱ्या ऋषींना मंत्रांची शक्ती वाढवण्यास सांगितले, जेणेकरून अग्नीची उष्णता वाढू शकेल. |
|
वास्तविक, मंत्रांची शक्ती अशी होती की तक्षकाला वाटले
की त्याला आगीच्या दिशेने ओढले जात आहे. मग इंद्राने तक्षकासोबत यज्ञाच्या
ठिकाणी जाण्याचे ठरवले. त्यानंतर, तक्षकाचे
प्राण वाचवण्याच्या अंतिम प्रयत्नात, देवतांनी
सापाची देवी मनसा देवीला बोलावले. देवांच्या हाकेवर मनसा देवीने तिचा मुलगा
अष्टिका पाठवला आणि यज्ञ थांबवण्याची जनमेजयला विनंती केली. |
|
यज्ञ थांबवण्यासाठी जनमेजयला राजी करणे सोपे
काम नव्हते, परंतु अष्टिका
सर्प सत्र यज्ञ थांबवण्यात यशस्वी झाले. अशा प्रकारे सापांचा राजा तक्षकाचे
प्राण वाचले. तो नवीन वर्धिनी पंचमीचा दिवस होता. तेव्हापासून या दिवशी नाग
पंचमीचा सण जिवंत सापांना श्रद्धांजली म्हणून साजरा केला जाऊ लागला. |
〰️〰️〰️〰️〰️〰️ |
नाग पंचमी विधी,नियम,पुजा |
〰️〰️〰️〰️〰️〰️ |
|
|
नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण
आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नाग पंचमी म्हणून साजरा केला
जातो. या दिवशी नाग दैवताची पूजा केली जाते. |
|
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण
म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी
हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला
प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा
मानला जातो. |
|
या वर्षी, पंचमीची तारीख 12 ऑगस्ट रोजी दुपारी 03.24 पासून सुरू होईल आणि 13 ऑगस्ट रोजी सकाळी 1.42 पर्यंत राहील. आचार्यांच्या मते नाग पंचमीचा
सण 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पूजेसाठी
सर्वात शुभ वेळ 13 ऑगस्ट रोजी
सकाळी 5:49 ते सकाळी 8.28 पर्यंत असेल. |
|
|
नागपंचमी पूजा विधी |
या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्य
कर्मांहून निवृत्त व्हावे. |
अंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे, अलंकार धारण करावे. |
पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या
पिलांची चित्रे काढावी. |
त्यांची पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करावी. |
नाग देवताची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा. |
या सणाला विशेषतः: गव्हाची खीर आणि चण्याची
डाळ,
गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची
पुरणाची दिंड तयार केली जाते. |
|
नागपंचमी मंत्र |
या दिवशी अष्टनागांच्या या मंत्राचा जप केला
पाहिजे. |
वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः। |
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनंजयौ ॥ |
एतेऽभयं प्रयच्छन्ति प्राणिनां प्राणजीविनाम्
॥ |
|
नागपंचमीचे नियम |
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले
जातात. तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये
नांगर चालवू नये असेही म्हटले जाते. |
|
कहाणी नागपंचमीची |
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या
ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस
आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत.
सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली
व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून
न्यायला येईल. असं म्हणू लागली. |
|
शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं
ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला.
हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं
तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी
मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या
बायकामुलांना ताकीद दिली की, हिला
कोणी चावू नका! |
|
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली.
तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी
लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण
रागावली. सर्व हकीकत नवर्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत्
आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण
करून,
तिला सासरी पावती केली. |
|
नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी
केली,
आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग
आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा
सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार
ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या
दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार
ठेवून निघून गेले. दुसर्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा
प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. |
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ |
नाग पंचमी आणि भगवान श्रीकृष्ण काय संबंध |
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ |
|
|
|
नाग पंचमी हा एक संवेदनशील सण आहे. नाग हा
भगवान शिव यांच्या गळ्यातील हार आहे. तर भगवान विष्णूंची शैय्या देखील आहे.
लोकजीवनातही लोकांचा सापाशी खोल संबंध असतो. अनेक पवित्र कारणांमुळे नागाची
देवता म्हणून पूजा केली जाते. |
|
नाग पंचमी आणि श्री कृष्ण संबंध |
|
नाग पंचमी पूजेचं एक प्रसंग भगवान श्री कृष्ण
यांच्याशी निगडित आहे. बालकृष्ण जेव्हा आपल्या मित्रांसह खेळत होते तेव्हा
त्यांना मारण्यासाठी कंस याने कालिया नावाच्या नागला पाठवले होते. आधीतर त्याने
गावात दहशत पसरवली. लोकं घाबरु लागले. |
|
एकदा जेव्हा श्री कृष्ण आपल्या मित्रांसोबत
खेळत होते तेव्हा त्यांचा चेंडू नदी पडला. ते घेण्यासाठी कृष्ण नदीत उतरले
तेव्हा कालियाने त्यांच्यावर आक्रमण केलं पण उलट कालियाला आपला जीव कसा वाचवला
हा प्रश्न पडला. त्याने कृष्णासमक्ष माफी मागितली आणि गावकर्यांना त्रास देणार
नसल्याचं वचन देत तेथून निघून गेले. कालिया नागावर श्री कृष्ण यांचा विजय देखील
नागपंचीम या रुपात साजरा केला जातो. |
|
नाग पंचमीच्या दिवशी काय करणे टाळावे |
या दिवशी जमी खणू नये. |
शेत नांगरणे अशुभ मानले जाते. |
या दिवशी टोकदार किंवा धारदार वस्तूचा वापर
करु नये. |
स्वयंपाक करताना लोखंडी तवा किंवा कढई वापरु
नये. |
कोणासाठी वाईट विचार ठेवू नये तसेच अपशब्द
बोलू नये. |
- Home
- gr. dt 06-02-2004 to10-11-2003
- जी.आर. दि.10-11-2003 to20-08-2003
- जी.आर. दि.27-05-2003 to 29-01-2003
- gr date.दि.20-08-2003 to27-05-2003
- जी.आर. दि.28-01-2003 to 27-01-2002
- जी.आर. दि.23-01-2002 to 30-08-2001
- जी.आर. दि.13/08/2001 to 12-02-2001
- जी.आर. दिनांक to 10-08-2000
- जी.आर. दिनांक 06-06-2000 to 30-03-2000
- जी.आर. दिनांक 30-03-2000 to05-02-2000
- .जी.आर. दिनांक 12-01-2000 to 30-06-1999
- जी.आर. दिनांक03-02-1999 to10-08-1996
- जी.आर. दिनांक13-08-1996 to18-01-1995
- जी.आर. दिनांक14-11-1994 to05-01-1993
- जी.आर. दिनांक14-11-1992 to 02-09-1989
- जी.आर. दि.12-05-1989 to14-11-1979
- जी.आर. दिनांक 14-11-1979 to 13-01-1965
नागपंचमी (श्रावण शुद्ध पंचमी)
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment