══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक ,आज कोरोना असल्याने सर्वच आपण घरी आहोत वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही विनंती .
________.
🌄 परिपाठ 🌄. _________
📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके संजय सर. 📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■■. |
आज दिनांक: ११/०९/२०२१. वार:शनिवार , महिना :भाद्रपद-शुक्लपक्ष, पंचमी. नक्षत्र :स्वाती.
योग:एन्द्र,करण:बव.
सूर्योदय:०६.२५,सूर्यास्त:०६.४५. ■■■■■■■■■■■■■■. |
सुविचार: आयुष्यात निश्चित कांही मिळवायचे असल्यास साहस असाव्यास पाहिजे.. ★★★★★★★★★★★★.
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
•••••••••••••••••••••••••••••••.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
प्रतिज्ञा |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
📜 भारताचे संविधान 📚.
•••••••••••••••••••••••••••••••. 🙏 प्रार्थना 🙏.
◆=========◆========.
👩💻 बोधकथा 👨💻.
________ 🛑 'मी' पणाचा त्याग' 🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एका विख्यात संताला भेटण्यासाठी एक राजा आला आणि म्हणाला,’’ तुम्ही मला त्या स्थितीमध्ये घेऊन जा, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात.’’ संताने म्हटले,’’ महाराज मी तुम्हाला त्या अवस्थेत निश्र्चित घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्ही एकटे माझ्या कुटीवर या.’’ राजा म्हणाला,’’ ठीक आहे.’’ दुस-या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला, राजाने कुटीच्या दारापाशी येताच संताच्या नावाने हाक मारली. त्याबरोबर आत जागे असणा-या संतांनी विचारले की कोण आले आहे, राजाने सांगितले,’’ मी राजा आलो आहे’’ संतांनी सांगितले की उद्या या. राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्हा कुटीपाशी गेला, त्याने हाक मारली, संतांनी तोच प्रश्र्न विचारला, राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्हणून राजाने सांगितले,’’ मी आलो आहे’’ संतांनी सांगितले, उद्या या. तिसरे दिवशी राजा पुन्हा गेला, दोन दिवसांप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले, ‘’मी आहे’’ संतानी पुन्हा उद्या या असे सुनावले. राजा चौथ्या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काहीही उत्तर दिले हाकलून देतात, त्यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता. मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे, आता चौथ्या दिवशी जाऊन बघु. चौथ्या दिवशी पण राजा गेला, त्याने संतांच्या नावाने हाक मारली, संतांनी आतूनच विचारले, कोण आहे, मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले, त्यांनी राजाला जवळ घेतले, घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, ‘’राजन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात, पहिले तीन दिवसात तुमच्या उत्तरात तुम्ही ‘मी’ आलो असे उदगार काढले पण मी तर तुम्हाला एकल्याच बोलकले होते .तुम्ही तुमच्या मी पणाला घेऊन आलात .मानवी जिवनात या मी पणाला कांही स्थान नाही .मी पणा सोडला की खूप कांही शिकायला मिळते. |
तात्पर्य : मानवाने "मी" पणा सोडल्यास खुप काही प्राप्त होते."मी" पणाचा मृत्यू ज्या दिवशी मानवातून होतो तो त्या दिवशी संतत्वकडे वाटचाल करू लागतो . |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
🎼 समूहगीत🎼
_________. |
🎰 दिनविशेष🎰. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ दिनविशेष : ११ सप्टेंबर : जागतिक प्रथमोपचार दिन |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
👣 ऋषी पंचमी👣 |
भारतात जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी, निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून ऋषीपंचमी हा सण साजरा करतात. |
सप्तर्षी, अरूंधती व गणपती यांची या दिवशी पूजा करतात. सप्तर्षींच्या सात, अरूंधतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपा-या मांडून पूजा करतात. बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाहीत. तसेच गाईचे दूध पीत नाहीत. असे करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात. खेडेगावातील बायकांना हा उपवास शास्त्रोक्त पध्दतीने करता येतो कारण घराच्या मागील भागात भाजीपाला, वेल इत्यादी लावलेले असतात. त्यांचा ह्या दिवशी उपयोग होतो. या दिवशी पाच प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या जेवणाच्या वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण करण्याची पध्दत आहे. |
|
महत्त्वाच्या घटना: |
◆१९७२ : नाट्यमंदार
निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला. |
◆१९६५ : भारत पाक युद्ध - भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले. |
◆१९६१ : ’विश्व
प्रकृती निधी’ (World Wildlife
Fund) ची स्थापना झाली. |
◆१९१९ : अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले. |
◆१८९३ : स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
◆१९०१ : आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, ’प्रेम आणि जीवन’, ’ भग्नमूर्ती’, ’चिनी मुलास’, ’निर्वासित’ ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रौढ शिक्षणविषयक कार्यासाठी त्यांना नेहरू पारितोषिक मिळाले होते. |
◆१८९५ : आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्न - १९८३ मरणोत्तर, १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
◆१९८७ : महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. |
◆१९६४ : गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक |
◆१९४८ : बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल |
◆१९२१ : सुब्रम्हण्यम
भारती – तामिळ साहित्यिक |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)नवव्या पंचवार्षिक योजनेत प्रतिमान ••••••••होते. २) कोणत्या देशामध्ये दुहेरी नागरिकता चे प्रयोजन नाही ?
३)भारतीय घटनेत भारताला कसे वर्णिती केले आहे ? (उत्तरे: १-गांधीवादी, २-संयुक्त राज्य अमेरिका,३-राज्यांचा संघ )
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 ठळक घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
■ राज्यात आरटीई प्रवेशाच्या ३२हजार जागा रिक्तच |
■ शिक्षकाची
नोकरी नको रे बाबा! डीएड करण्याकडे विद्यार्थ्यांची पाठ ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :. घोडके संजय सर. मो.९७३७१११२७७.
शिक्षक विचार मंच पुणे. ======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
No comments:
Post a Comment