╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा
विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही
विनंती .
________.
🌄 परिपाठ
🌄.
_________
📚 संकल्पना/संकलन:📚.
श्री .घोडके संजय सर.
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ आज दिनांक: ०१/०८/२०२१. वार:रविवार , महिना :आषाढ,कृष्णपक्ष.८.
नक्षत्र :भरणी.
योग:गंड,करण:तैतील.
सूर्योदय:०६.१५,सूर्यास्त:१९.१४. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ सुविचार:दुसऱ्यानी तुमच्याशी चांगले वागावे
असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.. ★★★★★★★★★★★★.
🇨🇮 राष्ट्रगीत🇨🇮
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
प्रतिज्ञा |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ 📜 भारताचे
संविधान 📚.
🙏 प्रार्थना 🙏.
◆=========◆======= |
🙏 सर्वेश्वरा
,शिवसुंदरा🙏.
●●●●●●●●●◆◆◆◆◆◆सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार
या अभिवादना |
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या
ने जीवना |
|
सुमनात तू, गगनात
तू |
तार्यांमध्ये फुलतोस तू |
सद्धर्म जे जगतामध्ये |
त्यांच्या मध्ये वसतोस तू |
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना |
|
श्रमतोस तू शेतांमध्ये |
तू राबसी श्रमिकांसवे |
जे रंजले अन् गांजले |
पुसतोस त्यांची आसवें |
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे
तुझे पद पावना |
|
न्यायार्थ जे लढती रणीं |
तलवार तू त्यांच्या करीं |
ध्येयार्थ जे तमीं चालती |
तू दीप त्यांच्या अंतरी |
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस
त्या तू साधना |
|
करुणाकरा, करुणा
तुझी |
असता मला भय कोठले ? |
मार्गावरी पुढती सदा |
पाहीन मी तव पाउलें |
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी
भीतीविना"
|
👩💻 बोधकथा 👨💻.
|
🛑 सोन्याची
कुदळ🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एका माणसाला दोन मुले होती जेव्हा तो म्हातारा
झाला. तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले आणि म्हटले,' आता
माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्यापूर्वी
मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्यामुळे मी
माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक
करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे
आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या
मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्याकडे काहीच राहणार नाही. त्यामुळे
धन-संपत्ती घ्यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी
कुदळ घ्यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने
कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या
मुलाने पैसा पाण्यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो
गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्यातून
मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्याला खोटे का
सांगितले? मग त्याच्या आत्म्याने म्हटले,'' नाही, वडील
खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा
विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्याने शेतात पिकाची पेरणी केली आणि
भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्त पीक त्याच्या शेतात आले होते. अशा प्रकारे
कुदळीने वास्तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला. तात्पर्य:संपन्नतेची खरी
चावी परिश्रमात आहे.जो परिश्रम करत असतो त्याच्या घरी समृद्धी, सुख
आवश्य असते. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
🎼 समूहगीत🎼
💫 उंच
उंच गगनात तिरंगा....
उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो |
जयहिंद भारती सूर एक नांदतो |
भारतमाता जन्म दायिनी अमृत पुत्रांची |
राष्ट्रपुरुष घडविता तुझी जिजाईची |
तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो |
नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे |
वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतिक ऐक्याचे |
आम्रतरू जणू वात्सल्याची नित्य साऊली देतो |
मनमंदिरी स्थान आईला नित्य आम्ही दिधले |
उत्थानास्तव भारतभूच्या जीवन वेचू आपुले |
तिची कस्तुरी गंधित माती भाळावर लावतो
_________ |
🎰 दिनविशेष🎰.
|
✧══════•❁❀❁•══════✧ |
दिनविशेष : १ ऑगस्ट : वनमहोत्सव दिन |
✧══════•❁❀❁•══════✧ |
📝 अण्णाभाऊ
साठे |
तुकाराम भाऊराव साठे (ऑगस्ट १, इ.स.
१९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले
जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे एका अस्पृश्य
मांगसमाजामध्ये जन्मलेले एक दलित व्यक्ती होते, आणि
त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते |
|
अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट इ.स. १९२०
रोजी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या
वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले
नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील
सर्वणांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न
केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी
जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता
आणि शकुंतला |
|
साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या
लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जी
१९ व्या आवृत्तीत आहे आणि इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा
पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये
मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित
केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील
भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी
लिहिली. |
|
साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या
लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य
अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार
लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी
आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि
ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक
आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि
अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते. |
|
मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या
लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला, जे याला डायस्टोपियन परिवाराच्या रूपात
दर्शवतात. आरती वाणीने त्यांच्या दोन गाण्यातून - "मुंबईची लावणी" आणि
"मुंबईचा गिरणीकामगार" –
दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान
और अन्यायपूर्ण" असे शहराला दर्शवणारे वर्णन केले आहे. ✧══════•❁❀❁•══════✧ |
📝 लोकमान्य
टिळक पुण्यतिथी
|
बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स.
१८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील
अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय
असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय
तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते
आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला
जातो. |
महत्त्वाच्या घटना: |
■२००१ : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट
२००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. |
■१९९६ : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते
डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर |
■१९९४ : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना
लागू झाली. जगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
◆ १९२० : ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ
साठे – लेखक, कवी व
समाजसुधारक |
◆१९१५ : श्री. ज. जोशी – कथाकार
व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व
कार्याध्यक्ष |
◆१८९९ : कमला नेहरू – जवाहरलाल
नेहरू यांच्या पत्नी |
◆१८८२ : पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न
(१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल
भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष |
◆१८३५ : महादेव मोरेश्वर कुंटे – कवी
व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे
त्यांचे काव्य विशेष गाजले. |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
●२००८ : हरकिशन
सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट
ब्यूरोचे सदस्य. |
●२००८ : अशोक
मांकड – क्रिकेटपटू |
●१९२० : लोकमान्य
बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्दगीतेचे
भाष्यकार |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)महाराष्ट्र राज्याचे पहिले
मुख्यमंत्री कोण?
२) महाराष्ट्रात सर्वाधिक
क्षेत्रफळअसणारा जिल्हा कोणता?
३) सजीव म्हणजे काय?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 *ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬. |
■ अकरावी सीईटीसाठी आले तबाबल ११ लाख अर्ज |
■ बोर्डाच्या बारावीच्या निकालाची अफवा- मंडळ अधिकृत तारीख घोषित करणार, अफवांवर
विश्वास ठेवू नये. |
■
सांग..सांग भोलानाथ शाळा भरेल काय?मित्र
पुन्हा भेटतील काय?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
शिक्षक विचार मंच पुणे. ======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
No comments:
Post a Comment