|
महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️ |
➿➿➿➿➿➿➿➿➿ |
🇮🇳 गाथा
बलिदानाची 🇮🇳 |
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी, |
चंद्रपूर 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
|
🚂💨💥🇮🇳💂♂️🇮🇳💥🌾💎 |
|
तिरंग्याचे आद्य रचनाकार |
🇮🇳 पिंगाली
वेंकय्या 🇮🇳 |
|
जन्म : 2
ऑगस्ट 1876 |
|
[भटलापेनुमारू
, मछलीपट्टनम जवळ , मद्रास
प्रेसीडेंसी , ब्रिटीश भारत (सध्याचे आंध्र प्रदेश , भारत)] |
|
मृत्यू : 4
जुलै 1963 (वय 86) |
( भारत ) |
|
राष्ट्रीयत्व : भारतीय प्रसिध्दी : भारतीय राष्ट्रीय |
ध्वजाची रचना |
|
भारताचा ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती
आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून
त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे
शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते. |
कृष्णा जिल्ह्यातील दिवी तालुक्यातील भटलापेन्नुमारू येथील हनुमंतरायुडू
आणि वेंकटरत्नम्मा या दांपत्याच्या पोटी २ ऑगस्ट 1876
रोजी पिंगाली यांचा जन्म झाला. देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९
व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले.
त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे
ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि
मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय
सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना
स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक
महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि
इतिहासाचे शिक्षण घेतले. |
पिंगाली यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या
विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास
आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी
होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे.
१९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही
संस्था स्थापन केली. |
१९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांनी सुमारे
३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या
तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले
जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळी
पर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन
पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये
पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात
पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने
देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे
लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये
ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक
एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि
सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते. बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज
फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी
अॅनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या
ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे
पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे
उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा
प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे
अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे
या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे
नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर
आले. |
१९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली
यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा
कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे
एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले
होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन
प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे
राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे
स्वीकारला नव्हता. गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस
बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक
असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी
सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे
अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याला
लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय
तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील
अंतिम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य
आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन
रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी
अशोकचक्राचा समावेश करण्यात आला. |
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना
सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय
नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची
वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते
दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे. |
राष्ट्रध्वजाची प्राथमिक कल्पना मांडणारे
पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी निधन झाले. |
|
जाणून तिंरग्याचे रचनाकार पिंगली वेंकैया
यांच्याबद्दलच्या १० खास गोष्टी |
|
♦वयाच्या १९व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात
भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून
ब्रिटिशांच्या बाजूने लढले. |
🔸याच काळात त्यांची आणि महात्मा गांधींची
दक्षिण आफ्रिके मध्ये भेट झाली. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही
नेते एकमेकांच्या संपर्कात होते. |
🔹पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते
हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव
देण्यात आले होते.त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य
असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे. |
🔸त्यांना उर्दू तसेच जपानी भाषेबरोबरच इतरही
अनेक भाषा अवगत होत्या. |
♦३१ मार्च १९२१ मध्ये पिंगली यांनी विजयवाडा
येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा
झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला
हंसराज यांनी या झेंड्यावर चरखा असावा असे सांगत चरख्यासहीत हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि
हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला. आणि अशाप्रकारे
तिरंग्याचा जन्म झाला. |
🔸१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य
मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा
राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी
तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले. |
🔹पिंगली यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली.
भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची त्यांची इच्छा होती.
मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने
त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. |
♦१९६३ साली पिंगली यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी २००९
साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले.
स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी
करण्यात आले होते. |
🔹२०११ साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर)
पिंगली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. |
🔸मागील काही वर्षांपासून त्यांच्या मुलीला
सरकारकडून पेन्शन देण्यात येत आहे |
|
🇮🇳 जयहिंद
🇮🇳 |
|
🌹🙏 विनम्र
अभिवादन 🙏🌷 |
♾♾♾ 46 ♾♾♾ |
स्त्रोत ~ Wikipedia
➖➖➖➖➖➖➖➖➖ |
🔹🔸 🇲 🇹 🇸 🔸🔹 |
📡📲 तंत्रज्ञानाची
धरुनी वाट, |
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲 |
- Home
- gr. dt 06-02-2004 to10-11-2003
- जी.आर. दि.10-11-2003 to20-08-2003
- जी.आर. दि.27-05-2003 to 29-01-2003
- gr date.दि.20-08-2003 to27-05-2003
- जी.आर. दि.28-01-2003 to 27-01-2002
- जी.आर. दि.23-01-2002 to 30-08-2001
- जी.आर. दि.13/08/2001 to 12-02-2001
- जी.आर. दिनांक to 10-08-2000
- जी.आर. दिनांक 06-06-2000 to 30-03-2000
- जी.आर. दिनांक 30-03-2000 to05-02-2000
- .जी.आर. दिनांक 12-01-2000 to 30-06-1999
- जी.आर. दिनांक03-02-1999 to10-08-1996
- जी.आर. दिनांक13-08-1996 to18-01-1995
- जी.आर. दिनांक14-11-1994 to05-01-1993
- जी.आर. दिनांक14-11-1992 to 02-09-1989
- जी.आर. दि.12-05-1989 to14-11-1979
- जी.आर. दिनांक 14-11-1979 to 13-01-1965
🇮🇳 गाथा बलिदानाची 🇮🇳 🇮🇳 पिंगाली वेंकय्या 🇮🇳 तिरंग्याचे आद्य रचनाकार=जन्म : 2 ऑगस्ट 1876
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment